पुन्हा एकदा ही अतिशय उग्रदेवी आहे ज्याप्रमाणे महाकाली का आहे त्याचप्रमाणे बगलामुखी माता देखील आहे मात्र तिथे विशेष कार्य म्हणजे सर्व प्रकारच्या शत्रूंवर विजय सर्व प्रकारच्या संकटांमधून मुक्ती देणे याचमुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातून उचकटवून लावणे आणि आपली अतिशय ताकदवान अशा तिच्या उर्जेने संरक्षण करणे हे प्रचंड काम बगलामुखी माता करत असते
बगलामुखी मातेचे रूप महाकाली माते इतके उग्र नसून आपण तिच्या ज्या मूर्ती बघतो त्यामध्ये ती अतिशय सुंदर पिवळे वस्त्र धारण केलेली अशी एक देवी रूपाने आपल्याला दिसून येते तिच्याकडे पाहिल्यानंतर महाकाली मातेच्या मूर्ती इतकी उग्र ती मूर्ती भासत नाही तर ती आपल्याकडे पाहून अतिशय सुंदर स्मितहास्य करीत असते बगलामुखी मातेचे रूप हे महाकाली मातेच्या मूर्तींपेक्षा अनेक पटीने सौम्य असते आणि शत्रूंचा विनाश करणे ह्या अनुषंगाने त्या मूर्तीचे स्वरूप आपल्याला दिसून येते.
पूर्वीच्या काळी अनेक राजे राजवाडे देखील युद्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी तिची पूजा करीत असत पण हे केवळ इतक्या क्षेत्रात मर्यादित नाही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपले अहितचिंतणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा असतात अशा प्रकारच्या नकारात्मक लोकांपासून अनेक विविध प्रकारच्या बाधा आपदा संकट यांसारख्या तसेच नजर बाधेसारख्या अतिशय विषारी नकारात्मक ऊर्जांपासून ही माता आपले रक्षण करते.
या मातेच्या उपासनाने आपल्या दुष्ट शत्रूंचे गुप्त शत्रूंचे आपल्यासमोर काहीही चालत नाही आणि आपण दैवी सुरक्षा कवच मध्ये आपले आयुष्य सुखाने सुरक्षेने जगू शकतो.
बगलामुखी मातेला पिवळ्या रंगाची सर्वच गोष्टी वस्त्रे अतिशय प्रिय आहेत त्यामुळे बगलामुखी मातेच्या पूजेमध्ये अधिकाधिक पिवळ्या रंगाचा वापर केला जातो उदाहरणार्थ पिवळ्या रंगाची फुले वापरणे पिवळ्या रंगाची ओढणी बगलामुखी मातेवर चढविणे पिवळ्या रंगाचे आसन पूजेसाठी तयार करून आपण स्वतः देखील पिवळ्या आसनावरच बसणे पूजेसाठी शक्यतो पिवळ्या रंगाचीच वस्त्रे धारण करणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमध्ये बगलामुखी मातेच्या पूजेत अधिकाधिक पिवळ्या रंगाचा वापर केला जातो
कोणत्याही देवी-देवतांची उपासना करण्यासाठी तंत्रोकता आणि पुराणोक्त असे दोन मार्ग आहेत. तंत्र हा मार्ग अतिशय वेगळा मार्ग असून तो सामान्यांसाठी नाही या मार्गाचे तांत्रिक किंवा त्यांच्या साधना वेगळा असतात आणि त्या मार्गाला सामान्य लोकांनी जाऊ नये असा माझा मनापासून सल्ला. अर्थातच तुमच्या आत्म्याचा जो मार्ग असेल त्यानुसार तुम्हाला साक्षात परमेश्वर मार्गदर्शन करेल आणि त्या मार्गावर तुम्हाला नेऊन पोहोचवेल.
माझा मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे यामध्ये तुम्ही मनापासून देवाला हाक मारा आणि शंभर टक्के सर्व गोष्टी देवावर सोडून द्या इथे तुमचा इगो मध्ये आला नाही पाहिजे मी काही करत आहे हे मध्ये आले नाही पाहिजे आणि मी एक फक्त मिडीयम आहे आणि सर्व गोष्टी मी देवावर सोपवत आहे कोणतीही पूजा करण्याचा विधी टेक्निक मला माहित नाही माझ्याकडून काही चुकल्यास मला माफ करावे पण हे देवा तुमच्याशिवाय मला कोणी नाही मला मदत करा माझे रक्षण करा आणि अशा भावनेने मनापासून देवावर प्रेम करावे जसे आपण आपल्या कोणत्याही आप्तेष्टांबरोबर करतो तसे ज्यावेळी हा प्रेमाचा दृढ बंद आपल्या आणि देवाच्या मध्ये निर्माण होतो त्यावेळी जगातील इतर कोणत्याही गोष्टींची आपल्याला गरज पडत नाही आणि हाच अखिल जगताचा योग्य मार्ग आहे. कोणत्याही विधीनुसार करावयास गेलात आणि तो चुकला तर देव तुम्हाला फटके देणारच म्हणून त्या मार्गाला आपण जाऊच नये आपल्या तन-मन-धनाने संपूर्ण शरणागती पत्करून आपल्या मनामध्ये देवाविषयी प्रेम आणि दृढ विश्वास निर्माण करावा की माझ्या देवाला मी सांगितलं आहे देव बघून घेईल.. संपला विषय.
त्यानंतर आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि आयुष्यात चमत्कारिक गोष्टी देव घडवतो आणि खऱ्या प्रेमाने स्वच्छ मनाने प्रचंड विश्वासाने जेव्हा आपण देवाला हाक मारतो तेव्हा तो आपल्या नक्कीच मदतीला येतो आपल्या नेहमी बरोबर असतो इतकेच काय आपल्याशी गप्पा मारतो आपल्याबरोबर खातो पितो मजा सुद्धा करतो तरी तुमच्या आत्म्याचा मार्ग देव तुम्हाला दाखवेल मला विचारले तर माझा हाच मार्ग आहे या व्यतिरिक्त मी काही झाकून ठेवले नाही कोणाला मी काही वेगळे सांगणार असे नाही.
जर तुम्ही खरे वागत असाल तरीही तुम्हाला तुमच्या आयुष्यात अत्यंत बिकट परिस्थितींना तोंड द्यावे लागत असेल विनाकारण लोक किंवा इतर गोष्टींमधून तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला मार्ग दिसणे बंद झाले असेल तर अर्थातच इतर देवतांबरोबरच बगलामुखी मातेची उपासना नक्की करा ती सर्व शत्रूंना मॅनेज करते कसं मॅनेज करायचा तो तिचा मुद्दा आहे पण आपले जबरदस्त रक्षण करण्यासाठी ती माता आहे आणि ती आई जेव्हा आपलं रक्षण करण्यासाठी येते तेव्हा आपल्याला कसलीही चिंता उरत नाही
आपण नेहमी कोणत्या देवांची उपासना केली पाहिजे हे थोडक्यात -
1. मंगलमूर्ती श्री गणेश यांचा नंबर पहिलाच लागतो ते सर्व मंगल कार्यासाठी आणि विघ्नहरण्यासाठी नेहमी आपल्याबरोबर असतात
2. कुलदेवी आणि कुलदेवता यांच्याशिवाय बाकी कोणतेही देव आपल्याला मदत करतच नाही त्यामुळे त्यांचे आवाहन सर्वप्रथम झालेच पाहिजे.
3. त्यानंतर तुमचे एक किंवा अनेक जे कोणी इष्ट देवा आणि इष्ट देवता असतील त्यांच्याशी अखंड प्रेमाचे नाते मेंटेन करा आणि त्यांच्या चरणांमध्ये शंभर टक्के सरेंडर व्हा इथे तुम्ही कोणताही बनाव करू शकत नाही कारण तुमच्या मनात चाललेल्या सर्व गोष्टी त्यांना माहीत असतात.
4. त्यानंतर ग्रामदेवी ग्रामदेवता नवग्रह विशिष्ट कार्यासाठी असणारे विशिष्ट देवी देवता वास्तुदेवता आणि तुमचे गुरु यांचे नामस्मरण उपासना पूजा अवश्य व्हावी.
तरी डोक्यामध्ये प्रश्न झालेला त्रास सर्व विसरून 100% शरणागती पत्करून मनापासून प्रेमाने ह्याच नव्हे सर्व देवतांना आवाहन करा आणि प्रेमाच्या मार्गावरून चाला हा मार्गच तुम्हाला माझ्याकडे दिसेल कारण मला फक्त एवढंच माहित आहे हा माझा मार्ग आहे.
तरी बगलामुखी माता तिच्या योग्य त्या भक्तांपर्यंत ही माहिती योग्य त्या वेळेला नक्की पोहोचवेल अशी मी तिच्याच चरणी प्रार्थना करते.
जय बगलामुखी माता